Friday, October 30, 2020

पूर्ण अपुर्ण ...⚪⚫⚪⚫

      चला.... चला.... चंद्रदर्शना ची वेळ झाली ,  दुध घेतल का ? मी आलेच , तुम्ही व्हा पुढे अशी काहीशी एकसारखीच लगबग आज सर्वत्र सुरू असेल... त्यात आज अजून एक पर्वणी म्हणजे "ब्लू मून " .... त्यामुळे यावेळची कोजागिरी पोर्णिमा थोडी विशेष. 

        आपल्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा अनुभवतीय ही पोर्णिमा पण , मन स्थिर नाही अस्वस्थ आहे ,  खूप सारे प्रश्न पडलेत.  कदाचित आपण एकट्यानेच विचार करून ,  या प्रश्नांची उत्तर मिळतील असे वाटत नाही , कदाचित एखादा वाचक सुद्धा सहजच उत्तर देऊन जाईल मला पडलेल्या प्रश्नांच !                 या अपेक्षेत !

      आज चंद्राला पूर्णत्व येणार आहे ,  जे मुठभर सुद्धा माणसांना नसते या पृथ्वीतलावर . आपण पूर्ण नाही आहोत ही गोष्ट मान्य न करणारी माणसे  ,  आपल्यात असलेली अपूर्णता कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा वायफळ प्रयत्न करणारी नाती ,  त्यांना आज या पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना भानं होईल पूर्णत्व काय असतं  त्याचं आणि ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःच अस्तित्व पणाला लावावं लागतं  याचही....  आणि तेव्हा कुठे अंधारावर विजय मिळवून पूर्णत्व प्राप्त केलेल्या चंद्राला वर्षातून एकदा उत्सवानिमित्त पाहतो आपण  . तसा तर तो दरच पौर्णिमेला आलेला असतो पण कोणाला त्याचं काही नसतं.  केवळ वार ,  तारीख,  दिवस,  महिने बदलणाऱ्याच या घटना ठरतात . 

            माणुस अपेक्षेने ग्रासला आहे ,  ठरवून टाकतो किंबहुना शिक्कामोर्तब करतो समोरचा कसा चुकतोय,  कसा वाईट आहे. नात्यांना स्वतःच गृहीत धरतो , त्याला नाती म्हणून फक्त आईवडील आणि त्यांच्याकडूनच विनामूल्य मिळालेले भाऊबहीणीचे नाते हीच माहीत असतात , पण काहीजण तर त्याही नात्यात अंतर निर्माण करतात.  इथे कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही हे वाक्य  ज्याने जगप्रसिद्ध केलं त्याला सलाम !   पण एक गोष्ट तो  सांगायला विसरला की ,  इथे नाती सुद्धा फुकट मिळत नाहीत . माया खर्च करावी लागते त्यासाठी ,  जीव गुंतवावा लागतो,  मोबदल्यात काय मिळणार याचा विचार न करता,  प्रसंगी आयुष्य पणाला लावावे लागते.  

      मनुष्य  कधी स्वतःहून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्नच करीत नाही  आणि मग सुंदर आयुष्य  , चंद्रासारखं तेजस्वी तारुण्य स्वतःच निर्माण केलेला गुंता सोडवण्यात व्यर्थ करतो.  आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी नवीन नाती जोडायचीच असतात , पण म्हणून आपली जन्मजात नाती विसरून कसं चालेल ?  उलट जो नव्या नात्याबरोबर आपली असलेली  नाती विलक्षण कौशल्याने हाताळतो ,  नात्याच्या सोबत चालतो , परकेपणाचा अंशही जाणवू देत नाही त्याच्या  आयुष्यात रोजच पोर्णिमेचा चंद्र उगवतो आणि नात्यातलं प्रेम खरोखर चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल वाटू लागते.  

       पौर्णिमेचा चंद्र हे  तर सांगत नाहीये  ना ,  पूर्णत्वाचा गर्व करणाऱ्या माणसास  , नको समजू स्वतःलाच  पूर्ण,   पूर्णत्वासाठी तु झटत राहा कारण पौर्णिमेला जो चंद्र अंधारावर मात करून चमकतो त्याला एक दिवसापुरते का असेना अमावस्येचा काळोख गिळून टाकतो ....  

  तु  तर साधारण मनुष्य आहेस...

                        तु  तर साधारण मनुष्य आहेस.... ⚫⚫⚫

आरती संजय गवळी 




Thursday, October 29, 2020

जन्मभूमि

       अनु..... ऐ .... अनु..... आई बोलावते ग तुला ! असे सांगून रमेश , अनुचा भाऊ झोपायला गच्चीवर गेला.  अनुचे बाबा   नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात . आईचं यावेळी काय काम  आहे हे पाहण्यासाठी अनु  गेली , तर आई अंगणात बसली  होती. 

अनु ,  "आई..." का बोलावलस मला ? काही काम होत का ग ?   आई , " नाही ग बाळा ! "  काही काम नाही,  सहज बोलावलं . म्हंटल आता अनु सासरी जाणार , असा निवांतपणा एकदा का लग्नाची तयारी सुरू झाली की नाही मिळायचा म्हणून मुद्दाम बोलावल.   (अनु एक स्वतंत्र विचारांची,  सुशिक्षित मुलगी आहे..) 

         आई ! मी काय थोडीच कायमची जाणार आहे ?  येईन मी हवं तेव्हा ..... तु उगाच काळजी करतेस बघ. हे बघ तु मला  गप्पा मारायला बोलावलंय ना ?  तर मग चल आपण बोलू . असं म्हणून अनुने आईला मिठी मारली आणि सुरू झाल्या गप्पागोष्टी सर्वात प्रेमळ,  अवर्णनीय अशा मायेच्या.  

      आई अनुला सांगू लागली , तिच्या लग्नानंतर माहेरच्या गोड आठवणी . प्रत्येक भेटीला माहेर नवं भासतं ग अनु !  एकदम बदललेली वस्तुंची जागा ,  सहजपणे एखादी वस्तु सापडतच नाही , अनोळखी  कोपरे, भिंती सगळ नवीन वाटत.   हे मन मानायला तयारच होत  नाही की हे बदल होत असतात आणि हे माझ्या एकटीपुरते नाहीत सगळ्यांच्याच आयुष्यात होतात.  

        पण का माहीत नाही अनोळखी वाटत राहत आपलच घर आपल्यालाच.   ते घर जिथे शाळा सुटल्यावर कोण आधी घरी पोहोचेल याची शर्यत असायची , ते  घर जिथे रविवारी अंगणात भावंडासोबत पंगत बसायची ,  रोज एका मैत्रिणीच्या अंगणातील पळापळी चा खेळ . किती साऱ्या गोष्टी मागे पडून जातात.  

पण खरं सांगू अनु , हे नवीन  भासणार माहेर ,  खूप ओढ लावतं मनाला,  प्रत्येक वेळेस तेवढ्याच नवेपणाण भेटते मी त्याला  आणि मग जरी आज खूप अवकाशाने,  नव्या नजरेने नुसतेच अंगण  न्याहाळून पाहिले तरी बोलत राहते एकएक आठवण मीच माझ्याशी आणि आकाशाकडे बघून एकदा डोळ्यात भरते साऱ्या आठवणी आणि घेते एक गिरकी स्वच्छंदपणे.  

      आई माहेरच्या आठवणीत रमलेली असतानाच अनु विचारते ,  आई... मग जेव्हा तुला माहेरची आठवण होत असे तेव्हा तु का नाही जायची ? अनु ,  काय आहे ना बाळा माहेरी असं मन होईल तेव्हा नाही जाता येत त्या साठी काही कार्य,  निमित्त,  सणवार,  दुखणीखुपणी,  बाळंतपण अशी काही कामं असतील तर जाणं होत.  

अनुने आईकडे आश्चर्यचकित होऊन पाहील,  म्हणजेच माहेर हे स्त्री साठी निमित्तमात्र होऊन जात का गं आई ?  अस कस असु शकत आई ? माझं  घर , जिथे आयुष्यातील 25 वर्ष घालवली , त्या माझ्या जन्मभूमिला  मी निमित्त काढून भेटायला यायचं ? 

      कस शक्य आहे हे आई ?  मला तर आता स्वातंत्र्यवीर सावरकर आठवू लागले आहेत , सातासमुद्रापार काळ्याकुट्ट अंधारातून आर्त हाक देताना तयाच्या  मातृभूमि ला....

ने मजसी  परत मातृभूमि ला ,  सागरा प्राण तळमळला....

 तेव्हा  त्यांचंही ह्रदय माहेराची ओढ मनात दाटून ठेवणााऱ्या स्त्री सारखेेेच  भासू लाागले आहे मला.  कशासाठी हवे  मला निमित्त माझ्या जन्मभूमि ला भेटायला ? मी का कोणाच्या बंदिवासात आहे  ? हक्क आहे मला,   जितके कष्ट तुम्ही रमेश साठी घेतलेे तितकेच माझ्यासाठी त्यामुळेच ह्या  जन्मभुुुमि वर जेवढी रमेश ची माया तेवढीच माझी सुद्धा.   एका नव्या नात्यात गुंफल्याने लगेेेच या मायेला परकी होईल काय मी ? 

बाबा, रमेश  नोकरीनिमित्त बाहेर राहतात त्यांचे पाय आपोआप वळतात घराकडे जेव्हा आठवण होईल तेव्हा ,  ते काय कोणाची परवानगी घेतात घराच्या ओढीनं येतात ना मग मी का नाही ?  

असं म्हणून अनुने अंगणातील माती हातावर घेतली आणि चांदणं भरलेल्या आभाळाकडे बघून सांगितल,  मी येईन मला हवं तेव्हा   आणि रुजेल ही पण प्रथा जेव्हा मी आवाज उठवेल.  

😊😊😊😊

आरती .... (भारत कन्या )   


Tuesday, October 27, 2020

बहु जलाओगे, तो बेटी कहा से लाओगे।

           रविवार चा दिवस होता ,  ऑफिस ला सुट्टी असल्याने दिव्या ने घर आवरायच ठरवले.  समीर  , दिव्याचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने स्वयंपाक न  करताच ती कामाला लागली . अचानक घर आवरताना तिला आठवलं मागच्या वेळेस जेंव्हा घर आवरले तेव्हा मई (दिव्या  ची नणंद ) होत्या मदतीला.मनातच स्मित हास्य करून   तिने काम आवरून मई ला फोन करू असे ठरवले आणि आवरणयात मग्न झाली.  

          कोणती वाईट इच्छा घेऊन ऊगवला होता तो दिवस कोण जाणे की दिव्याला त्या दिवशी मई ची सतत आठवण होऊन सुद्धा ती कामात व्यस्त राहिल्याने फोन लावू शकली  नाही . आणि त्या वाईट दिवसातील अत्यंत वाईट बातमी मिळाली.  

               मई ला तिच्या सासरच्या माणसांनी  हुंडया साठी जाळून मारले.  दिव्या चे हात पाय सुन्न , विश्वास बसेना , काय करावे सुचेना , समीर नव्हता आणि त्याचा फोनही लागेना. अस काही दिव्या पहिल्यांदाच अनुभवत होती आणि जगातील वाईट माणसे कोणत्या थराला जाऊ शकतात याचा विचार ती करत होती.  दिव्या च्या लग्नानंतर ती मई सोबत 6 महिने राहिली होती.  त्यामुळे दोघीमधील विषेश जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. अंतिम संस्काराला समीर वेळेत पोहचू शकला नाही. भाऊ-बहीणीच नातं फार प्रेमाच होतं.

     इतकी गुणी , मुलगी,  देखणी , अत्यंत चुणचुणीत  मई फक्त एका चुकीने गेली ती म्हणजे  आईवडिलांनी  सहन करायचच शिकवले , कारण  तु मुलगी आहेस , सोशीक बन तर आयुष्य आहे .सासरच्यांनी कितीही त्रास दिला तरी तसच सहन करायचे इथेच  चुकतो आपण , मुलगी म्हणून तिने कायकाय करावे आणि काय करू नये याचा पाढाच तयार करतो.   

     मई तर  गेली , आईवडील भाऊ - बहीण सावरले असतील यातुन पण आजही मईचा मारेकरी मोकाट फिरतोय .अजुन कोर्टात केस चालूच आहे.  तपासानंतर त्याचे पहिल्यांदाच एक लग्न झाल्याचे उघड झाले.  म्हणजे ही माणसे माणसे नाहीत . त्यांना लग्न म्हणजेही पैसे कमावण्याचे साधन वाटते . आता त्याच पहिल्या पत्नी बरोबर संसार थाटून दोन  मुलांना जन्म दिला. पण एक निष्पाप बळी गेला आहे.  आणि असे रोज किती जातात?  

बेटी बचाओ, बेटी पढाओ हे फार चांगल समजल आहे लोकांना  खुप छान योजना आहे ही सरकार ची  पण त्या लाडली ची मई होऊ  नये .  महिला आज अंतराळात पोहचली पण ही संख्या सर्वच क्षेत्रात मुठभर आहे . जोपर्यंत सर्वात शेवटची स्त्री  सुरक्षित,  सुशिक्षित,  आणि स्वावलंबी,  होत नाही तोपर्यंत रोज एक मई तयार होईल . हळदी कुंकवाचे कार्यक्रम बास झाले आता.  पहिल्यांदा हातात  धरलेली लेखणी जोपर्यंत  वेळ प्रसंगी एकटे राहण्याचे,  लढण्याचे बळ देत नाही तोपर्यंत थांबू  नका.  

 2012 वर्ष चालू होत ही घटना घडली तेव्हा  डाॅ.  ए.  पी. जे.  अब्दुल कलाम  यांनी 2020 भारत महासत्ता होणार असा  दृष्टीकोन लोकांसमोर मांडला होता  . आज हा ब्लॉग वाचल्यानंतर सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या जनतेने एक गोष्ट नक्की करावी मी  हुंडा घेणार नाही व त्या द्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्यास सुरुवात करेन  . उशिरा का होईना आपला देश महासत्ता होईल.  

Join my telegram channel  👇👇👇👇                  @kaviaratisanjay

               

  




Monday, October 26, 2020

सोनेरी दसरा , सोनेरी शुभेच्छा

 सोनं ! अग्निमधे तापवा , आणखी ऊजळुन निघेल .

दगडावर घासा ,  झिजून न जाता खरेपणाची प्रचिती देईल. 

टोकदार हत्यारे वापरून हवा तसा आकार द्याल,

तर मनप्रसन्न दागिने घडतील , पण ओळख मिटणार नाही.

अशा खडतर परीक्षा तुमच्या वाट्यास येतात  म्हणून तर, 

तुम्हीच सोनं आहात आणि मी भाग्यवान 

             माझी नाती, माझी माणसं ,

              सोन्या सारखीच आहेत.  

🌹☘☘दसऱ्याच्या प्रेममय शुभेच्छा. ☘☘🌹

@copyright claim Arati .❤

 



पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...